Ad will apear here
Next
‘भाजपच्या राजकीय सामर्थ्यामध्ये अनुसूचित मोर्चाचा वाटा महत्त्वाचा’
मुंबई : ‘भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला असून पक्षाच्या सामर्थ्यामध्ये अनुसूचित जाती मोर्चाचा वाटा महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी केले.

भाजप प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या दोन दिवसांच्या अभ्यासवर्ग व प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विजय गिरकर, डॉ. मिलींद माने, रमेश बुंदिले, रामचंद्र अवसारे, सुधाकर भालेराव, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सोनकर यांनी सांगितले की, ‘भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने सामाजिक न्यायासाठी अनेक निर्णय घेतले असून महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. आपल्या सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहचविण्याचे काम अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत सरकारचे काम न्यावे व अंत्योदयाचा विचार अंमलात आणावा.’

राजकुमार बडोले यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. दिलीप कांबळे यांनी भाजप मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देत असल्याने नमूद केले.

सुभाष पारधी म्हणाले की, ‘भाजपच्या सरकारने केलेल्या विकासकामांचे महत्त्व राज्यातील अनुसूचित जातीच्या लोकांना पटले आहे. राज्याच्या प्रत्येक गावात अनुसूचित मोर्चाच्या शाखा उघडाव्यात.’

कार्यशाळेत एकूण आठ सत्रात विविध विषयांवर भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, खासदार अमर साबळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, आमदार भाई गिरकर, दीपक जाधव (चिपळूण) आणि अमित गोरखे (पुणे) यांनी मार्गदर्शन केले. कार्यसमिती बैठकीस दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल रामनाथ कोविंद यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव चंद्रकांत हिवराळे यांनी मांडला.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले. आभार सुखदेव अडागळे यांनी मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZXZBH
Similar Posts
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
‘मुख्यमंत्री सचिवालयातील आदरातिथ्यावरील खर्च पूर्वीसारखाच’ मुंबई : ‘मुख्यमंत्री सचिवालयात आदरातिथ्यावर केलेल्या दरवर्षीच्या खर्चाची आकडेवारी पाहिली, तर ही सरासरी आधीच्या सरकराच्या कार्यकाळात होती तशीच आहे. असे असताना काँग्रेसचे बेताल नेते संजय निरूपम हे बरळतात आणि त्याचीच री महाराष्ट्रातील ‘जाणते’ नेतृत्त्व म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते सन्माननीय शरद पवारही
‘देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language